पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील रायतळे ग्रामपंचायत ही सुमारे 4125 लोकसंख्या असलेली ११ वाड्यांमध्ये पसरलेली ग्रामपंचायत आहे. या गावातील कातकरी पाडा ही पारंपारिकपणे दुर्लक्षित आणि स्थलांतरित वस्ती होती. येथे एकूण ४७ आदिम कुटुंबे राहत होती. पाण्याची टंचाई, रोजगाराचा अभाव आणि घरांच्या अभावामुळे ही कुटुंबे वारंवार स्थलांतरित होत असत.
वरील सर्व समस्या लक्षात घेऊन तत्कालीन गट विकास अधिकारी श्री. समीर वाठारकर, गावाच्या सरपंच श्रीमती अरुणा कृष्णा चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. वसंत भोरे, तसेच ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे ही समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. सर्व सरकारी विभाग, विविध सरकारी योजना, सीएसआर निधी, सामाजिक संस्था आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही वस्ती आज ग्रामीण भागातील आदिवासी विकासासाठी एक आदर्श मॉडेल बनली आहे.